Saturday, May 23, 2026
HomeAheriप्रभाग क्रमांक 12 पाताअहेरी येथे "होऊ द्या चर्चा" करूया बोल घेवड्या शासनाच्या...

प्रभाग क्रमांक 12 पाताअहेरी येथे “होऊ द्या चर्चा” करूया बोल घेवड्या शासनाच्या भांडाफोड या कार्यक्रमाला सर्वसामान्य जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

अहेरी, १३ ऑक्टोंबर २०२३ ::- दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता पाताअहेरी प्रभाग क्रमांक 12 येथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री विनायक राऊत पूर्व विदर्भ संपर्क नेते श्री प्रकाशजी वाघ पूर्व विदर्भ समन्वयक श्री महेश जी केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा यांच्या नेतृत्वात होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न झाली.        यावेळी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी जनतेसोबत संवाद साधताना केंद्र शासन व राज्य शासन जवळपास 100 च्या वर योजना जाहीर केले अद्याप त्या योजनांची नावे सुद्धा नागरिकांना माहीतच नाही? त्या योजनाच्या लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल त्याचा अर्ज कुठे सादर करावा? विविध योजना असल्याने त्या योजनाचे कार्यालय सुद्धा वेगवेगळे असतात त्यामुळे ऑनलाइन प्रोसिजर असल्याने लाभार्थ्यांना त्या योजनाच्या कागदोपत्रीच्या पाठपुरावा करण्यासाठी अशिक्षित लाभार्थी कुठून करणार? असे अनेक प्रश्न लाभार्थ्यासमोर निर्माण झाले.       शासनाकडून कितीही योजना राबविण्यात आले त्या योजनाचा अंमलबजावणी होऊन थेट जनतेपर्यंत पोहोचत नसेल त्या योजना चा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत नसेल तर अशा पोकळ योजनाच्या काय फायदा? सरकार सर्व योजना कागदावर राबविण्यापेक्षा घरपोच लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घरपोच करायला पाहिजे होते.      परंतु सरकारच्या नियतीत खोट असल्याने जनतेला योजनांचा लाभ मिळाला नाही. मागील अनेक वर्षापासून बेरोजगारी वाढत आहे ,लोकांच्या हाताला काम नाही, महागाई सतत वाढत आहे, अन्नदाता शेतकरी बेहाल आहे, शिक्षण महागलेला आहे, शासकीय नोकर भरती बंदच्या कगारावर आहे, रस्त्यांची दूरव्यवस्था झालेली आहे, बेरोजगार युवक रोजगारसाठी वन वन फिरत आहे असे अनेक प्रश्न असताना केंद्र शासन व राज्य शासन जनतेचे मूलभूत प्रश्नांना बाजूला सारून केवळ खुर्ची वाचविण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करून घटनाबाह्य सरकार राज्याच्या जनतेला विकासापासून कोसोदूर ठेवले असे घनाघाती प्रश्न उपस्थित करीत होउ द्या चर्चा या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी थेट जनतेशी संवाद साधला यावेळी श्री विलास भाऊ सिडाम सदस्य नगरपंचायत अहेरी श्री प्रफुल एरणे, तालुकाप्रमुख अहेरी श्री सुनील वासनिक ग्रामीण तालुकाप्रमुख अहेरी सौ चंदनाताई बिश्नोई उपजिल्हा संघटिका अहेरी विधानसभा आयान पठाण युवा सेना शहर प्रमुख शोभाताई कुमरे शिवसैनिक रविभाऊ कपलवार दिनेश रंगूवार आरिफ शेख श्री मारुती आत्राम मारुती सिडम वसंत नैताम दिनेश मडावी यशवंत सिदाम असे बहुसंख्येने महिला व पुरुषांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular