VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/दिभना,११-०१-२०२४::-मौजा दिभना तेथे माळी समाज संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सर्व धर्म समभाव असुन समता बंधुता जोपासावी धर्माच्या नावाखाली मत मागनाऱ्यांना आपल्या मुलांना रोजगार व शिक्षण संदर्भात विचारणा करणे काळाची गरज. सत्ताधाऱ्यांच्या भुलथापाला मतदान करुन लोक प्रतिनिधी निवडू नये व स्वतःच्या अधिकाराने मतदान करुन योग्य लोक प्रतिनिधी निवडणे काळाची गरज असे प्रतिपादन एड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित विश्वजित भाऊ कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस, नामदेव जी किरसान साहेब महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अरविंद जी कात्रटवार सहसंपर्क प्रमुख शिवसेना, विलास जी दशमुखे माजी उपसभापती गडचिरोली, अभिलाषा गावतुरे मॅडम, नेताजी गावतुरे, विलासजी जेंगठे अजय मोहुर्ले, केशवजी जेंगठे, व सर्व गणमान्य मंडळी उपस्थित होते.
