Saturday, May 23, 2026
HomeChamorshiचामोर्शी तालुक्यात अवैध रेती उत्खनन वाहतूक होत आहे,, महसूल विभाग आता तरी...

चामोर्शी तालुक्यात अवैध रेती उत्खनन वाहतूक होत आहे,, महसूल विभाग आता तरी गंभीर होणार का…?

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

अवैध वाहतूक रोखण्याकरिता नेमलेले पथक फक्त दिखावा, कारवाई मात्र शून्य शून्य.

शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा चुना.

गडचिरोली/चामोर्शी,१४-०२-२०२४::-तालुक्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांत होत आहे.   सद्यास्थितीत एकही रेती घाट लिलाव झाले नसताना बाधकामा करिता वाळू येत आहे तरी कुठून ? असा प्रश्न नागरिकामध्ये उपस्थित होत आहे. 

रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.   शासनाचे लाखो रुपये या वाळू तस्करीमुळे बुडत आहे. याला जबाबदार कोण,ही भरपाई कोण करणार असाही प्रश्न चर्चेत आहे.

  तालुक्यातील आमगाव बोरबन घाट, विसापूर,ताकडघाट, खोडदाघाट, दोंगरसर वगर,मोहर्ली /फराडा, वेलतुर /तुकून घाट, बोरघाट ,या सर्व नदीघाटातून दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॅक्टर वाहनांतून बिनधास्तपणे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. वाळूचोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याला निम्मेदार कोण,सुमारे तीस ते पस्तीस वाहनांतून वाळू वाहतूक केली जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चामोर्शी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत असल्याची नागरिकात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

 शहरासह ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, वाळूमाफियांकडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत.     वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे सोबती दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सायंकाळी सात वाजता पासून सकाळी सहा वाजे पर्यंत वाळूची वाहतूक बिनधास्त सुरू असते वाळूचोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून,त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular