Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliपराभवाला न जुमानता न थांबता नेतृत्व करणारे खरे नेते —जनतेसाठी पायाला भिंगरी...

पराभवाला न जुमानता न थांबता नेतृत्व करणारे खरे नेते —जनतेसाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे माजी खासदार डॉ. अशोकजी नेते…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

 गडचिरोली ,३१ डिसेंबर २०२५::- (नविनवर्ष विशेष लेख) सरत्या वर्षाला निरोप, नव्या वर्षात नव्या आशेचा संदेश — राजकारणाच्या वाटेवर चालताना जय-पराजय हे येतच असतात.काही जण विजयाने मोठे होतात,पण काही पराभव होऊनसुद्धा अधिक ताकदीने उभे राहतात — अशी मोजकीच माणसं खरी नेतृत्वाची ओळख निर्माण करतात.हार-जित, जय-पराजय हे साहजिकच आहे.

याच संदर्भात दिवंगत लोकनेते, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळी आजही मनात घुमतात —

“न हार में, न जीत में,किंचित नहीं भयभीत मैं…संघर्ष पथ पर जो चले,यह भी सही, वह भी सही…”

या ओळींप्रमाणेच संघर्षाला जीवनमूल्य मानून, जनतेसाठी अखंड झटणाऱ्या नेतृत्वाचे नाव म्हणजे — माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आदरणीय डॉ. अशोकजी नेते साहेब…..

नावातच ‘नेते’ — कामातही खरे लोकनेते नावातच “नेते” असलेले हे व्यक्तिमत्त्व,खऱ्या अर्थाने जनतेचे नेते म्हणून ओळखले जाते. दीन-दलित, शोषित-वंचित, आदिवासी, ओबीसी —समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज बनून डॉ. अशोकजी नेते साहेबांनी आपले संपूर्ण राजकीय आयुष्य लोकांसाठी समर्पित केले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून शेतमजुरांच्या वेदनांपर्यंत,आदिवासींच्या हक्कांपासून तरुणांच्या रोजगारापर्यंत,ओबीसी समाजाच्या न्याय्य मागण्यांपर्यंत —प्रत्येक विषय त्यांनी केवळ सभागृहात मांडलाच नाही,तर तो मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

सत्ता असो वा नसो — जनतेशी नातं कायम

आजही गडचिरोली येथील त्यांचे जनसंपर्क कार्यालय जनतेने गजबजलेले असते.ही गर्दी म्हणजे लोकांचा विश्वास — तोही कोणत्याही पदाविना.कोणी शेतकरी तक्रार घेऊन येतो,कोणी आदिवासी आपली व्यथा मांडतो, तर कोणी सामान्य नागरिक न्यायाच्या अपेक्षेने येतो…आणि प्रत्येकालाच साहेबांकडून आपुलकीचा शब्द,मार्गदर्शन आणि दिलासा मिळतो.हीच खरी लोकनेत्याची ओळख आहे.दहा वर्षांचा खासदारकीचा कार्यकाळ — विकासाची ठळक पावलं आपल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात मा.खा.डॉ. अशोकजी नेते साहेबांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक विकासकामे केली.

 गडचिरोली–वडसा रेल्वे प्रकल्प जिल्ह्यात आणला, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज,सुरजागड लोह प्रकल्प,सिंचनासाठी चिचडोह बॅरेज, कोटगल बॅरेज, रस्ते, पूल व दळणवळण व्यवस्था मजबूत केली,दुर्गम व आदिवासी भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला आज गडचिरोली जिल्ह्यात ज्या सुविधा नागरिक वापरत आहेत, त्यामागे डॉ. अशोकजी नेते साहेबांची दूरदृष्टी आणि अथक पाठपुरावा आहे —हे कोणीही नाकारू शकत नाही.

सन्मानातून अधोरेखित झालेले सामाजिक कार्य त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत पुण्यातील नामवंत जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूट यांनी “सांसद आदर्श पुरस्कार” देऊन सन्मानित केले.

तसेच South Western American University (USA)

यांनी गोवा येथे Doctor of Social Work ही मानद पदवी देऊन गौरव केला.

*पराभवाने न खचता — नव्या जोमाने जनतेत*

राजकारणात पराभव येतात,

पण डॉ. अशोकजी नेते साहेब कधीच थांबले नाहीत.

आजही ते पायाला भिंगरी लावून

गावोगावी, खेड्यापाड्यांत,

शेतात-शिवारात फिरताना दिसतात.

जनतेशी थेट संवाद,

सामान्यांच्या समस्या समजून घेणं,

आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं —हेच त्यांचे खरे राजकारण आहे.

सरत्या वर्षाला निरोप — नव्या वर्षाला आशेचा संदेश

हे सरते वर्ष अनेक चढ-उतार घेऊन गेले, पण संघर्षातूनच नवी दिशा मिळते.

नवीन वर्ष २०२६ हे — शेतकऱ्यांना न्याय देणारं,आदिवासींना हक्क देणारं,तरुणांना रोजगार देणारं,ओबीसी समाजाला बळ देणारं,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह,संपूर्ण विदर्भाला विकासाच्या मार्गावर नेणारं ठरो —हीच मनापासून प्रार्थना.

नववर्षाच्या शुभेच्छा.. नवीन वर्षाच्या निमित्ताने

आदरणीय डॉ. अशोकजी नेते साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनतेच्या सेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो — हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

समस्त शेतकरी बांधवांना आणि सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व मंगलमय शुभकामना…!

 लेखनकर्ता :- ✍️ दिवाकर रामदास गेडाम

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख ग्रामपंचायत सदस्य, व्याहाड बुज. ता. सावली 

📞 मो. नं. 9673757718 ,9370499136

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular