VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
श्री श्री हरिगुरुचाँद मतुआ मिशन आलापल्ली तर्फे 2 दिवशीय हरिनाम महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन.
गडचिरोली/अहेरी,३१-०१-२०२४::- तालुक्यातील मोद्दुमोडगू येथे श्री श्री हरिगुरुचाँद मतुआ मिशन आलापल्ली तर्फे 2 दिवशीय मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास कमेटीच्या विनंतीला मान देऊन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम उपस्थिती.
मतुआ समाजाचे धर्मगुरू श्री श्री हरिचाँद ठाकूर व श्री श्री गुरूचाँद ठाकूर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी कशे मतुआ समाजाची निर्मिती केली त्या नंतर त्यांचा वारसा जोगेंद्रजी मंडल यांनी समाजाचे नेतृत्व केले व भारतीय संविधानात डॉ बाबासाहेब आंबेडकर व जोगेंद्रजी मंडल यांचा काय सहभाग आहे यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी योग्य मार्गदर्शन केले.
या वेळी आदरणीय रवी गोसाई, आदरणीय प्रकाश पागल,आदरणीय गोपाल गोसाई,आदरणीय दुलाल गोसाई,आदरणीय विजू गोसाई,डॉ ज्योतीश मल्लिक,जितेंद्र हलदार,नारायण अधिकारी,निखिल मंडल,गणेश सिकदर,प्रदीप मंडल,किशोर महालदार,सधन मालाकार,मनोज बाला,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,प्रवीण रेषे,नदीम सय्यद सह कमेटीचे पदाधिकारी व मतुआ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
