Monday, September 14, 2026
HomeAheriअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पीक व घरांचे नुकसानीची पंचनामे करून तात्काळ...

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पीक व घरांचे नुकसानीची पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

काँग्रेसनेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी,

गडचिरोली/अहेरी, ३० एप्रिल २०२५::- मंगळवार ला झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटामुळे शेतकऱ्यांची व नागरिकांची अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पिकांचे आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी आविसं,काँग्रेस काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जि.प माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.अवकाळी पाऊस,वादळी वारा आणि गारपीटामुळे अहेरी तालुक्याला खूप मोठा फटका बसले असून यामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांची अतोनात नुकसान झाले.काँग्रेसनेते कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार यांना सांगून नुकसानग्रसतांचे पंचांनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular